Breking News

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

माझ्या बातमी नंतर गंगानगरच्या पाण्यासाठी 30 लाखांचा निधी

गंगानगरच्या पाण्यासाठी 30 लाखांचा निधी
दै. पुण्यनगरी च्या वृताने प्रशासन कामाला: जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
 तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत तऱ्हावद गंगानगर येथील पाणी समस्या व इतर कामासाठी जिल्हापरिषदेच्या आदिवासी उपाययोजने अंतर्गत 30 लाखाच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतुन गावात पाण्याची सोय केली जाणार आहे. सदर निधीमुळे विस्थापितांच्या पाण्याच्या प्रश्न कायमच्या मार्गी लागणार आहे. याबाबत नुकतेच दै. पुण्यनगरीने येथील समस्याबाबत सचित्र वृत्त प्रकाशित केले. या वृत्तांच्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून तातडीने निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे विस्थापितांनी समाधान व्यक्त केले आहे.
 तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत असलेल्या तऱ्हावद (गंगानगर) गावातील पाण्याची समस्यांने उग्ररूप धारण केले आहे. ग्रामस्थाना दूषित पाण्याने तहान भागवावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात होता. आश्वासन देऊन हि समस्यां सुटत नसल्याने ग्रामस्थामध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत 3 सप्टेंबर रोजी दै. पुण्यनगरीने गंगानगरकरांची पाण्याची समस्या सुटणार कधी या शिर्षका खाली सचित्र बातमी प्रसिद्ध केली होती... सन 2002 मध्ये तऱ्हावद पुनर्वसन येथे तेरा गावठानाचे पुनर्वसन करण्यात आले होते. या गावाची लोकसंख्या दोन हजारा पेक्षा अधिक असून साधारणतः आठशे 86 कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. पुनर्वसनाच्या वेळी प्रशासना कडून विविध सुविधाचे आश्वासन देऊन गाव विस्तथापित करण्यात आले..मात्र विस्थापितानंतर येथील रहवाश्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन 2002 मध्ये गावाला आमदार निधी व नर्मदा विकास प्रकल्प अंतर्गत 9 हातपंप बसविण्यात आले. मात्र काही महिन्यातच सदर हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडले. सध्या गावात 9 पैकी फक्त 2 हातपंप सुरु आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 75 हजार लिटरची एक पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. सन 2014 मध्ये करण्यात आलेली पाणी पुरवठा लाईन ठीकठिकाणी फुटली असून पाईपाना देखील गज लागला आहे. त्यामुळे मागील सुमारे अडीच वर्षांपासून
गावकऱ्याना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थानी केली आहे. पिण्याचे पाणी योग्य नसल्याने तऱ्हावद, खेडले, नांदळा या गावातुन सुमारे 4 कि.मी पायपीठ करीत पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे गंगानागरकरानी आपल्या विविध मागण्याबाबत 27 जानेवारी 2016 रोजी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व नर्मदा बचाव विकास प्रकल्प आदी विभागाने महिन्याभरात समसा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 8 महिने उलटूनही समस्या न सुटल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र या समस्यांबाबत दि 3 सप्टेंबर रोजी दै. पुण्यनगरी मधून सचित्र वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृताची जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ क्लशेट्टी यांनी तात्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार 14 सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत आदिवासी उपाययोजने अंतर्गत विस्थापित झालेल्या तऱ्हावद पुनर्वसन गंगानगर गावातील पाणी समस्या व उपाययोजनेसाठी 30 लाखाच्या निधी मंजूर करण्यात आला. मंजूर निधीमुळे पाण्याची समस्यां सुटण्यास मदत होणार आहे. या निधीतून 22 लाखाची रु खर्चून साडे सात कि.मी. पाण्याची पाईप लाईन केली जाणार आहे. दीड लाख रु रकमेचा स्विच रूम उभारला जाणार आहे. तसेच सोयीनुसार 5×2 प्रमाणे 3 लाख खर्चून 2 सार्वजनिक हौद, 80 हजार रकमेचे यंत्र सामुग्री बसविण्यात येणार आहे...

बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

गंगानगरकरांची पाण्याची समस्या सुटणार कधी ?

तळोदा तालुक्यातील पुनर्वसन वसाहत असलेले तऱ्हावद गंगानगर गावातील पाण्याची पाण्याची उग्ररूप धारण करीत आहे. 9 हातपंपापैकी 7 हातपंप नादुरुस्त असून मागील दोन वर्षापासून गावातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटली आहे. ग्रामस्थाना दूषित पाण्याने तहान भागवावी लागत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. आश्वासन देऊनही समस्यां सुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. पुनर्वसन करून आमची फसवणूक केल्याचा आरोप पुनर्वसितानी केला आहे...
 तळोदा तालुक्यातील तऱ्हावद पुनर्वसन वसाहत असलेल्या तऱ्हावद गंगानगर या विस्थापित गावाची पाण्याची समस्या गँभिर बनली आहे. सन 2002 मध्ये 13 गावठानाचे पुनर्वसन गंगानगर येथे करण्यात आले. या गावाची लोकसंख्या 2000 हजारा पेक्षा अधिक असून साधारणतः 886 कुटुंबे येथे राहतात. पुनर्वसनाच्या वेळी प्रशासनाकडून विविध सुविधाचे आश्वासन देऊन येथे बाधितांचे गाव विस्तथापन करण्यात आले.. मात्र विस्थापनानंतर येथील रहिवाश्याच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुनर्वसनानंतर सन 2002 मध्ये या गावाला आमदार निधी व
नर्मदा विकास प्रकल्प अंतर्गत 9 हातपंप बसविण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच सदर हातपंप नादुरुस्त होऊन बंद पडले. सध्या गावात 9 पैकी फक्त 2 हातपंप सुरु आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून 75000 लिटरची एक पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. परंतु लोकसंख्येनुसार सदर पाण्याची टाकी गावकऱ्यांना पुरेशी नाही. या टाकीतून अर्ध्याच गावाला पाणी मिळते. त्यात ही सन 2014 मध्ये करण्यात आलेली पाणी पुरवठा लाईन ठीकठिकाणी फुटली असून पाईपाना देखील गज लागला आहे. त्यामुळे मागील सुमारे अडीच वर्षांपासून गावकऱ्याना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या पाईप लाईनमधून दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात साथीच्या आजारासह त्वचा विकाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी योग्य नसल्याने तऱ्हावद, खेडले, नांदळा या गावातुन सुमारे 4 कि.मी पायपीठ करीत पाणी आणत आहेत. भर पावसाळ्यात गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत तसेच इतर मागण्याबाबत 27 -01-2016 रोजी गावकऱ्यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या
नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी व नर्मदा बचाव विकास प्रकल्प आदी विभागाने महिन्याभरात समसा सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आठ महिने उलटूनही समस्या न सुटल्याने आजही गावातील महिला व मुलांना रोजगार, शिक्षण सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या आरोप ग्रामस्थानी केला आहे... संबंधीत विभागाने याकडे लक्ष देऊन समस्यां सोडवण्याची मागणी केली आहे.

 नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेतृत्वात आठ महिन्यांपूर्वी पाण्याच्या प्रश्न मार्गी लागावा यासह काही प्रमुख मागण्यांसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी व नर्मदा विकास प्रकल्पाच्या माध्यमातून महिन्याभरात कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप समस्या न सुटल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकांती करावी लागत आहे. 
 शामसिंग पाडवी ग्रामस्थ गंगानगर







सोमवार, १२ सप्टेंबर, २०१६

दानिश घडवतोय तळोदयात सामाजिक एकात्मतेचे दर्शन

तळोदा शहरातील येथील 11 वर्षीय दानिश मुक्तार पिंजारी या बालकाने श्री ची स्थापना करून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडविले आहे. शहरात शांतता नांदावी, हिंदू मुस्लिम मध्ये बंधूभाव निर्माण व्हावा ह्या हेतूने गणेश स्थापना केल्याचे दानिश सांगतो. या उपक्रमानंतर दानिशचे सर्वत्र कौतुक होत आहे....
मजहब नहीं सिखाता आपसमें वैर रखना..! या प्रमाणे तळोदा येथील 5 वीत शिक्षण घेणारा अकरा वर्षीय दानिश मुक्तार पिंजारी यानें हिंदू मुस्लिम एकता अबाधित राहावी, हा हेतू मनात ठेवून जाती धर्माचा तिढात न पडता एकतेचा प्रतीक असलेल्या गणपतीची स्थापना करुण एक आदर्श निर्माण केला आहे. दानिशला गणेश मूर्तीचे विशेष आकर्षण असल्याने. दानिश मूर्ती विक्रेत्यांकडे जाऊन मुर्त्या पाहत असे. दिवसभर विविध गणेश मुर्त्या पाहून दानिश कुतूहलाने मूर्ती विकर्त्याला हि मूर्तीबाबत माहिती विचारत असे. लालबागच्या राजा व दगडू शेठ हलवाई या मूर्त्यांचे दानीशला मोठे आकर्षण निर्माण झाले. श्रीच्या कथा ऐकून व विविध रंगीबेरंगी गणेश मूर्त्यांनी दानिशला चांगलाच आकर्षित केले. गणेश स्थापनेबाबत दानिशने त्यांच्या काही मित्राना विचारणा केली. त्यांच्या योग्य प्रतिसाद न मिळाल्याने दानिश खचला नाही. त्याने कल्पना टॉकीज गल्लीतील बाळ गणेश मित्रमंडळातील अध्यक्ष व सदस्यांना त्यांच्या मंडपात आपला गणपती स्थापना करण्याची विनंती केली.. मंडपात मूर्ती बसविण्याच्या होकार मिळताच दानिशने खाऊच्या पैश्याने गणपतीची छोटीशी मूर्ती विकत घेऊन तीची विधिवत स्थापना केली. दररोज नित्यनियमाने मदजीतमध्ये नमाज अदा करून आल्यावर सकाळ, संध्याकाळी स्वतः श्रीची आरती करतो, नैवेद्य देतो व दररोज प्रसाद वाटप करतो. सत्यनाराणाची पूजा सह मंडपात होत आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमात दानिश मोठ्या भक्तीभावाने रमतो. दानिशने स्थापन केलेल्या श्री च्या मूर्तीकडे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. सामाजिक एकात्मता जोपासली जावी यासाठी दानिश दरवर्षी श्रीची स्थापना करणार असल्याचे तो म्हणतो. याबाबत त्याच्याशी संवाद साधला असता. हिन्दू मुस्लिम में लढाई न हो. एकसाथ में सब मिलकर रहे कोई लढाई ना करे, भगवान तो भगवान होता है! हर भगवान की पूजा करे हर भगवान को नमस्ते करे, हर भगवान को सलाम करे।* असे त्याने सांगितले. दानिशच्या या उपक्रमाचे व त्याने निर्माण केलेल्या सामाजिक एकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे......










रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

माझ्या बातमीच्या वृत्ताने सा.बा.विभागाची उडाली झोप.

आमदारांसह अधिकाऱ्यांनी केली हातोडा पुलाची पाहणी...
 माझ्या बातमीच्या वृत्ताने सा.बा.विभागाची उडाली झोप.
जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या कारणे दाखवा नोटीस....

तळोदा नंदुरबार रस्त्याला जोडणारा हातोडा पुलाचे उद्घाटनापूर्वीच ठिकठिकाणी भराव खचला असून पुलाचे काम निकृष्ठ झाल्याचे सविस्तर वृत्त दै पुण्यनगरीने प्रसिद्ध करून प्रशासनाच्या बोगस काम चव्हाट्यावर आणले. या वृत्ताने संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यासोबत पुलाची पाहणी केली. पुलावर ठिकठिकाणी पडलेले तडे, खचलेला भराव पाहून आमदार पाडवी चांगलेच संतापले. यावेळी त्यांना उपस्थित अधिकाऱ्याना धारेवर धरत कानउघाडणी केली. पुलाच्या बांधाकामात अपहार झाला असल्याचा आरोप करून कामाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल. अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी सदर बाब गँभीर असल्याचे सांगुन संबंधीत विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले.
 महाराष्ट्र व गुजरात राज्याचा सिमेवरील हातोडा पूल विविध तांत्रिक अडचणींसह अन्य बाबींमुळे चर्चेत आला. तत्कालीन पालक मंत्री गिरीश महाजन व शहादा तळोदा विधानसभाचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी 6 वर्षांपासून रखडलेला हतोडा पूल जून महिनापूर्वी सुरु करणार असल्याचे असश्वासन दिले होते. मात्र तापीनदीला पाणी सोडल्याने पुलाचे काम बंद आहे. 90 टक्के काम पूर्णत्वाकडे असताना पुलाचे झालेल्या कामाच्या ठिकठिकाणी तडे गेल्याने संबंधीत विभागाचे कामाचे वाभाडे चव्हाट्यावर आले आहे याबाबत दै.पुण्यनगरीने शुक्रवारी सचित्र वृत्त प्रकाशित केल्याने प्रशासनाची झोप उडाली. या वृताची दखल घेत आमदार उदेसिंग पाडवी यांनी तात्काळ संबंधीत विभागाला दूरध्वनी करून पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुनील पिंगळे व सहकारी यांच्यासह आ. उदेसिंग पाडवी विश्वनाथ कलाल, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, शहर अध्यक्ष हेमलाल मगरे, डॉ.स्वप्नील बैसाने, युवा मोर्चाचे शिरीष माळी, माजी नगरसेवक भगवान मगरे, महेंद्र वाणी, माजी नगरसेवक भास्कर मराठे, आदींनी पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. पूलाचे निकृष्ट काम पाहून आमदार पाडवी यांनी सा.बा.विभागाचे अभियंता पिंगळे यांना चांगलेच धारेवर धरले. पुलावर आवश्यक तो भराव व रोलरींग न केल्यामुळे सदर प्रकार घडला असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. पुलाच्या दोघा बाजूच्या संरक्षण कठडयाच्या भराव पूर्णपणे खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आवशक्य तो भराव व रोलरींग न करता डांबरीकरणं का केले? हा संशोधनाचा विषय आहे. अधिकाऱ्यांनी बेजाबदार केलेल्या कामामुळे शासनाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कामाचा निधी वाया गेला असून सदर काम पुन्हा करावे लागणार आहे. हातोडा पूल हा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या विकासाचा सेतू असल्याचे सांगत, पुलाचे काम निकृष्ठ दर्जेचे झाले असून यात अपहार झाला असल्याचा आरोप आमदार पाडवी यांनी यावेळी केला. याबाबत अभियंता सुनील पिंगळे यांनी वरिष्ठ याबाबत माहिती देतील म्हणत जबाबदारी झटकली. या पुलाच्या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबारकडे आहे. वेळोवेळी पाहणी करून योग्य त्या सूचना देऊन काम करवून घेण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता वर्षा आहिरे, धुळे अधिक्षक वाघ यांची आहे. मात्र या अधिकाऱ्यानी पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशट्टी यांनी सदर बाब गँभिर असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती दै. पुण्यनगरी प्रतिनिधी सुधाकर मराठे यांना दिली......
हातोडा पूल विकासाचा सेतू आहे. याबाबत वेळोवेळी निधी साठी प्रयत्न करून निधी उपलब्ध केला आहे. मात्र पुलाचा भराव खचला असून पुलाला मोठाली तळे गेली आहेत. पुलावर योग्य तो भराव व रोलरींग केली नसताना देखील त्यावर डांबरी करणं करून निधी वाया करणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी तसेच मुख्य कार्यकारी अभियंता यांनी अद्याप पावेतो एकदाही पुलाची पाहणी केलेली नाही. सदर अधिकारी कुणाचे फोन उचलत नसून कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आहेत. बेजबाबदार अधिकारी वर योग्य ती कारवाइ व्हावी याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करणार आहे...
 *आमदार उदेसिंग पाडवी* *शहादा - तळोदा विधानसभा क्षेत्र -*
हातोडा पुलाच्या बातमीनंतर खान्देशात गाजला हातोडा पुलावर केलेला खान्देशी चिमटा
तात्काळ  बातमीची दखल जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी घेतली व मला  WHATSAPP  वर कळवले...


दै.पुण्यनगरीची दखल बातमी 





शनिवार, १० सप्टेंबर, २०१६

उद्घाटनापूर्वीच हातोडा पुलास तडे

तळोदा नंदुरबार रस्त्याला जोडणारा तापी नदीवर बांधला जाणारा हातोडा पुलाचे उद्घाटनापूर्वीच ठिकठिकाणी भर खचला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. हातोडा पुलामुळे तळोदा नंदुरबारचे अंतर कमी होईल, या अपेक्षेने काम पूर्ण होण्याची आतुरतेने नागरिक प्रतीक्षा करीत आहेत. असे असताना पुलाचा भराव खचू लागल्याने निकृष्ट कामाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. याकडे संबंधीत विभागाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.....
नंदुरबार तलोदाकडे येजा करण्यासाठी प्रवासी व प्रवासी व वाहनधारकांना प्रकाशा किंवा कुकरमुंडा मार्गे जावे लागत असल्याने फेरा पडत आहे. तळोदा तालुक्याच्या थेट जिल्ह्याच्या ठिकाण असलेल्या नंदूरबारशी संपर्क यावा, यासाठी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांचा प्रमुख पुढाकाराने सन २००७-०८ मध्य हातोडा पूलाचे भूमिपूजन झाले. या पुलाचे उद्घाटन दोन मंत्र्यानी केल्याने पूल चर्चेचा विषय बनला होता. नंदुरबार जिल्ह्याचा विकासाचा सेतू म्हणून ओळखला जाणारा गुजरात राज्याचा सिमेवरील हातोडा पूल विविध तांत्रिक अडचणींसह अन्य बाबींमुळे चर्चेत आला आहे. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन व विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांनी सहावर्षा पासून पुलाचे रखडलेले काम जून महिनापूर्वी सुरु करण्याचे असश्वासन दिले होते. या पुलाचे निम्मे काम होत असताना नागरिकाना पुलाच्या उद्घाटनाची प्रतिक्षा लागली. पुलाची एकूण लांबी ६७५ मिटर, रुंदी १२ मीटर, २ फूट पाथ एकूण १२ उंची नदीचे पात्र, एकूण दगडापासून ५४ मीटर बांधकाम २८ मिटर असे आहे. सध्या तापीनदीला पाणी सोडण्यात आल्याने काम बंद आहे. काम झालेले असताना उद्घाटनापूर्वीच सदर पुलाचा भराव खचला आहे. पुलावर मोठमोठी तडे पडली आहेत. त्यामुळे सदर कामात सार्वजनिक बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार समोर आला आहे. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सदर निकृष्ट कामामुळे अनेकवर्षांपासून वाट पाहत असलेल्या जिल्हावासीयांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. संबंधीत पूल उभारत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारीवर्गाने या कडे लक्ष दिले असते तर हे काम निकृष्ट दर्जाचे झाले नसते असा आरोप नागरिक करत आहेत. संबंधीत कामाची चौकशी कारवाई करण्याची मागणी होत आहे.....






रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

पुण्यनगरीचा परिणाम* स्मशानभूमी नसलेल्या गावांना अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश

माझ्या बातमीची दखल  दि १९ रोजी प्रसारित झालेल्या तळोदा तालुक्यात ५१ गावात स्मशानभूमीचा अभाव या माझ्या वृताची दखल नंदुरबार जिल्ह्याधिकारी कलशेट्टी यांनी तत्काळ घेवून संबंधित प्रशासनाला अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले....  धन्यवाद साहेब..

 स्मशानभूमी नसलेल्या गावांना अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश
`पुण्यनगरीचा दणका' : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बीडीओनी दिल्या सूचना.... 
 पुण्यनगरीच्या बातमीनानंतर प्रशासनाला आली जाग    
तालुक्यातील आदिवासी बहुल गावांमधील पक्क्या स्मशानभूमी नसलेल्या व शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या नसलेल्या गावांचा परिपूर्ण प्रस्ताव व ग्रामपंचायत निहाय बांधकामाचे अंदाजपत्रक बाबत माहिती उपलब्ध करण्याचे आदेश गटविकास अधिकारी शरद मगर यांनी संबंधित ग्रामसेवकाना दिले आहेत. याबाबत दै.`पुण्यनगरी' तुन तळोदयातील स्मशानभूमी नसलेल्या गावातील स्थिती व नागरिकांच्या अडचणी मांडण्यात आली होती. या वृताची दखल घेवून संबंधित अधिकाऱ्याना सूचना केल्या आहेत. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यानी संबंधित ग्रामसेवकांना आदेश बजावले आहेत. तळोदा तालुक्यातील ५१ग्रामपंचायतींना स्मशानभूमीचा अभाव ` अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष असल्याची बातमी दि-१९ रोजी `दै. पुण्यनगरी'वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या वृताची दखल  घेतली आहे. जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये तळोदा गटविकास अधिकारी शरद मगर यांनी ग्रामसेवकाना आदेश बजावले आहेत. या आदेशात शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या नसलेल्या गावातील पक्क्या स्मशानभूमी नसलेल्या गावांचा परिपुर्ण प्रस्ताव  व
  ग्रामपंचयाती निहाय बांधकामाचे अंदाजपत्रक तात्काळ मागविण्यात आले आहेत. तळोदा तालुक्यात दुर्गम अतिदुर्गम भागातील ६७ ग्रामपंचायतीपैकी ५१ गावांना स्मशानभूमी नसल्याने मयतांवर अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातील बहुतेक गावांमध्ये जागा असून देखील स्मशानभूमी नाही. तर काही गावात जागेअभावी स्मशानशेड बांधण्यात आलेले नाहीत. अशी अवस्था आहे. त्यामुळे नदी नाल्याच्या काठावर तर काही गावात शेतावरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. याबाबत वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी दखल घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने गटविकास अधिकारी शरद मगर यांनी पक्क्या शेड नसलेल्या  अंमलपाडा, रामपूर, रतनपाडा, अमोनी, रापापुर, धवळीविहीर,कोठार, चौगाव खुर्द, खर्डी बु, चौगाव बु, छोटा धनपुर, चिनोदा, दलेलपुर, धनपुर, सिंलिंगपूर, खर्डी, खु,सावरपाडा, अलवान,इच्छागव्हाण, करडे, काझीपुर, खरवड (गोसावी वस्ती), खेडले, खुशगव्हाण, बेलीपाडा, लाखापुर फो, लाखापुर रे, लोभानी, मोहिदा, मोरवड, नवागाव, न्यूबन, पिंपरपाडा, राणापुर, बंधारा, पाडळपुर, जीवननगर (गोपाळपूर पुन), रोझवे, सलसाडी, सरदारनगर, शिर्वे,सोमावल खु, तळवे , तऱ्हावद, (आदिवासी वस्ती) गंगानगर (तऱ्हावद पुन),वाल्हेरी, झिरी आदी स्मशानभूमी नसलेल्या ४७ गावांचे प्रस्ताव व स्मशान भूमी बांधकामाचे ग्रामपंचायती निहाय अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी मगर यांनी बजावले आहेत.

 *प्रतिक्रिया*- जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने तळोदा तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या नसलेल्या, स्मशानभूमी नसलेल्या गावांचे प्रस्ताव व बांधकामांचे अंदाजपत्रक तात्काळ ग्रामसेवकाना सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 




शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

तळोदा तालुक्यात 51 ग्रामपंचयातीना स्मशानभूमीचा अभाव......

आयुष्यभर सुख दु:खाचे चटके सोसणाऱ्या माणसांची मृत्यूनंतरही अवहेलना होत असल्याचे चित्र समोर आले आहे.आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील तळोदा तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गावांना स्मशानभूमी नसल्याने मयतावर अंत्यसंस्कारासाठी समस्यां निर्माण होण्याची दुर्दवी प्रकार संबंधीत प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे उदाहरण आहे. अनेक गावांमध्ये जागा असून देखील स्मशानभूमी नाहीत. तर काही गावात जागेअभावी स्मशानशेड बांधन्यात आलेले नाहीत. अशी अवस्था आहे. त्यामुळे नदी, नाल्याच्या काठाणवर तर काही गावांत शेतावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.                          
तळोदा तालुक्यात बहुतेक गावांना स्मशानभूमीचा अभावी मरणानंतर हि मरण यातना भोगाव्या लागत आहेत. अनेक गावांमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी उघड्या जागेचा वापर करावा लागत असल्याने पावसाळ्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे. तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीपैकी 51 ग्रामपंचायतींना स्मशान भूमी नसल्याने ऐन पावसाळ्यात मयतावर अंत्यसंस्कार करावेत कुठे असा प्रश्न नाग्रीकांसमोर उपस्थित होत आहे.  
तळोदा तालुक्यात एकूण 67 ग्रापंचायती आहे. 67 ग्रामपंचायत पैकी केवळ 16 गावानाच ग्रामपंचायतीच्या पक्क्या स्मशानभूमी आहेत. उर्वरित 51 गावांना स्मशानभूमी अभावी मरणानंतरही मृत्यू देहाचा अवहेलना होत आहे. स्मशानभूमी शेड नसल्यामुळे पावसाळ्यात गावातील एखाद्या व्यक्तीच्या निधन झाल्यास अंत्यसंस्काराची प्रमुख अडचण निर्माण होत आहे.
चिखलात बसूनच मृतदेहाला अग्निडाग द्यावा लागण्याची वेळ नातेलगांवर येत असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. स्मशानभूमीत शेड नाही, पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था व पाऊस यामुळे मृतदेहासह नातेवाईकांना जीवंतपणे नरक यातना सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे समस्यां असलेली गावे हि आदिवासी बहुल लोकसंखेच्या आहेत. निवडणुकीसाठी आदिवासींच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या प्रतिनिधनीही याकडे दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधीत विभागाने लक्ष घालून गावांमध्ये उभारावी, अशी मागणी करण्यात येत आहे...
*स्मशान भूमी नसलेली अथवा कच्ची स्मशानभूमी असलेले गावे* अंमलपाडा, रामपूर, रतनपाडा, अमोनी, रापापुर, धवळीविहीर,कोठार, चौगाव खुर्द, खर्डी बु, भंवर, चौगाव बु, छोटा धनपुर, चिनोदा,दलेलपुर, दसवड, धनपुर, सिंलिंगपूर, खर्डी, खु,सावरपाडा, अलवान,इच्छागव्हाण, करडे, काझीपुर, खरवड, खेडले, खुशगव्हाण, बेलीपाडा, लाखापुर फो, लाखापुर रे, लोभानी, मोहिदा, मोरवड, नवागाव, न्यूबन, पिंपरपाडा, राणापुर, बंधारा, पाडळपुर, जीवननगर (गोपाळपूर पुन), रोझवे, सलसाडी, सरदारनगर, शिर्वे,सोमावल खु, तळवे , तऱ्हावद, गंगानगर (तऱ्हावद पुन),वाल्हेरी, झिरी आदी
 पक्की स्मशानभूमी असलेली गावे  बोरद, नर्मदा नगर, नलगव्हाण, रांझणी, प्रतापपुर, राजविहिर, राणापुर, रोझवे पुन, सोमावल बु, तुळाजे, आमलाड, बुधावल, धानोरा, मालदा, मोड, मोदलपाडा या बोटावर मोजण्या इतक्या गावांना शेड असलेली स्मशानभूमी आहेत.

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

खान्देशी चिमटा गाजतोय सोशल मिडियावर

तळोदा तालुक्यातील शिक्षकांच्या खान्देशी भाषेतील चिमटा गाजतोय सोशल मिडियावर, राज्यभरातून मिळतोय प्रतिसाद, सध्या सर्वत्र सोशल मीडियाचे वेड लागलंय, अगदी लाहान्यान पासून वयोवृद्ध व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करताना दिसतोय. फेसबुक, व्हाट्टसअप्प, ट्विटर आदी सोशल साईटवर खाते उघडून वेगवेगळी माहिती शेयर करण्यात तरुण पुढे आहेत. त्यातच कॉपी पेस्ट करणारे, स्वतंत्र लिखाण करणारे असे अनेकजण सोशल मिडियावर दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतंत्र लेखक तयार होत आहेत. त्यातच आपल्यात असलेले कला कौशल्य सादर करण्यासाठी सोशल मीडिया हि एक हक्काची जागा बनली आहे... यांवरूनच तळोदा तालुक्यातील तळवे माध्यमिक शाळेतील मिलिंद धोदरे या शिक्षकाने सोशल मीडियाच्या वापर करत फेसबुक वर खान्देशी चिमटा म्हणून स्वतंत्र पेज बनवले आहे. आपल्या अफाट वाचनाच्या फायदा व शब्द यमकात जुडवण्याच्या त्यांच्या कलेने अनेक कविता तसेच जागतिक विषयांवर मार्मिक व टीकात्मक भाष्य ते करीत आहे आहे. शिक्षक धोदरे हे ज्ञानदाना सोबतच आपल्यात असलेले कौशलगुण सोशल मीडियाच्या साह्याने शेयर करत आहे. अहिराणी भाषेची गोडी निर्माण व्हावी, भाषेचा प्रसार व्हावा, हा हेतू मनात बाळगून जागतिक विषयावर खान्देशी भाषेवर मार्मिक लेखानाच्या माध्यमातून (चिमटा) ते दररोज फेसबुक पेजवर लोड करीत आहे. राजकारण, समाजकारण चालू घडामोडी आदी विविध विषयांवर मिलिंद ढोढरे यांनी मार्मिक (टीकात्मक) लेखन केले आहे.
    त्यात नुकत्याच घडलेल्या घटना बाबत

यंदा ना पावसाळा तर भलताच चावट शे! 
कोठे कमी ते कोठे त्यानं भीतीनं सावट शे! 
जुना जमाना ना, जरी त्या पूल शेतस!  तुना कहर माँ त्या पण आज गुल शेतस!  चुक्या आमन्या शेतस तरी बोट तूनाजकडे दाखवसुत,  आते पासून आम्हे आश्या जुना पुल्सना मागे लागसुत! 

अश्या जागतिक व ताज्या विषयावर चिमटा घेतला आहे. तसेच

पेट्रोल भरले आले हेल्मेट न्या जरी सक्त्या शेतस!*  त्यांना पहिलेच जनता या भारी-भारी युक्त्या शेतस!  काही काही गोष्टी  पल पल घडी वर,  फक्त मरण स्ले सांगाले जरी सजवा नई!  नाईलाजे पेट्रोल भरापुर्त मांगाले तरी कोणी लाजव नई!  कोणा पण .... डोकास्वर कोणी लन टोपी ऱ्हास ! ज्याफा हेल्मेट नई! त्याले आई बत सोफी ऱ्हास!

पाचोरा बारी येथील घडलेल्या घटनेवर


                                         रातना टाईम, सार काही पल भर मा घडी गय!  दुसरा च क्षण ले घर ना पण वर पाणी चढी गय!  सारं काही वाही गय! फक्त डोया मा धारा राहेल शेत!  त्या ढग फुटी माँ गणज जीव पाचोरा बारी मा जायेल शेत!
तो महापुर निघी गया गरीब दुब्यासले मारीनी! 
तुमले जी पण मदत करता येई, ल्या गरिबस्ले तारी नी!.... 


अश्या प्रकारे मार्मिक चिमटा तयार करून पाचोरा बारीत वाहून गेलेल्या घरे, व्यक्ती यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची मागणी त्यांनी चिमटाद्वारे केली होती.. अश्या प्रकारचा शासनाने हेल्मेट निर्णय कोपर्डी घटना, अश्या विविध विषयांवर त्यांचे मार्मिक चिमटे प्रसिद्ध झाला होता. सदर चिमटयाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. आतापावेतो त 150 खान्देशी चिमटे सोशल मीडियावर अपलोड झाले आहेत. साहित्याची आवड असलेल्या मिलिंद धोधरे यांच्या कविता साहित्य संमेलनात गाजल्या आहेत. अनेक साहित्यिक त्यांना साहित्य संमेलनात आवर्जून बोलवतात. या व्यतिरिक्त खान्देशी चिमटा ह्या लेखनाने त्यांना एक वेगळी ओळख दिली आहे. सदर चिमटा हा खान्देशसह राज्यभरात सोशल मीडियावर फिरत आहे. राज्यभरातून विविध ठिणाहून चिंमटयाला दाद मिळत आहे. विशेष म्हणजे सदर चिमटा हा खान्देशी भाषेत असल्याने सर्वत्र खान्देशात हे पेज प्रसिद्ध झाले आहे. सदर लेखनाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 
पुणे येथून अहिराणी कस्तुरी या मासिकाचे संपादक तथा अहिराणी साहित्यिक विजयाताई मानमोळे, आदींसह अनेक जेष्ठ लेखकांनी मिलिंद धोधरे यांची भेट घेतली आहे. धुळे येथील जेष्ठ साहित्यीक रमेश यांच्या त्र्यमासिक खान्देशनी वानगी यात खान्देशी चिमटा प्रसिद्ध होत आहे...*
 इंग्रजी भाषेचा वाढता कल त्यामुळे अहिराणी भाषेला आलेली मरगड, आदी पाहता भाषा टिकून राहावी भाषेचा ओलावा निर्माण व्हावा ह्या हेतूने खान्देशी चिमटा हे पेज तयार केले आहे. खान्देशी चिंमटयाला आधुनिकतेची जोड म्हणून त्यात विविध रंग इफेक्ट्स चित्र आदींचा वापर करून अधिक आकर्षित बनविण्याचा प्रयत्न आहे. साधारणतः 1 चिंमट्या करिता 5 तास लागतात. मात्र लेखनाला मिळालेली दाद ऊर्जा वाढवण्याचे काम करते. चिंमटयाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
 मिलिंद धोदरे...